ताटात भात येण्यापूर्वी,
त्याचा जमिनीपासूनचा ताटापर्यंतचा प्रवास फारच मेहनती, परावलंबी, निसर्गाच्या मूडशी मिळते जुळते घेणारा तरीही रंजक... हा प्रवास चालू होतो साधारण एप्रिल/ मे पासून ते आतापर्यंत, दिवाळीपर्यंत... त्यामध्ये यासाठी जमीन योग्य करणे, नांगरणे, ती उन्हात तापविणे, मृग नक्षत्राची चाहूल लागली की भात पेरणी करणे.. पाऊस वेळेत पडला तर ठीक, नाहीतर सगळे कष्ट वाया.. पाऊस झाल्यानंतर, मग हळुवार याला हिरवेगार कोंब फुटतात.. जमिनीच्या बाहेर येऊन, वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी आसुसलेले, जशी लहान बाळेच ती... वाऱ्याच्या, पावसाबरोबर हेलकावे घेत, आनंद घेत ती वाढु लागतात.. आजूबाजूचे तन, वेळच्यावेळी भांगलन करून काढले जाते.. त्यांची वाढ अजून सहज होते... असे करत करत साधारण नवरात्रीच्या वेळेस त्यांच्या मधून हळुवारपणे लोम्ब्या डोकावू लागतात.. मग अजून काळजी घ्यावी लागते... पावसाची साथ इथपर्यंत तर आवश्यक असते, मग तो परतायला लागतो.. पण त्याचा कल बदलला तर सगळे अवघड.. अवघे उभार पीक आडवे होऊ शकते... मग आली कापणी... पूर्वी बाय लोक आनंद गाणी म्हणत कापणी करायच्या... या सर्व प्रवासातून, मग हा आजचा दिवस, मळणीचा दिवस, या कष्टातून उभारलेल्या समाधानाचा दिवस.. नंतर या भाताला थोडे ऊन दिले जाईल, चांगले वाळवले जाईल आणि ३/४ महिन्यांनी त्याची कांंडपनी होऊन त्यातून मस्त तांदूळ बाहेर पडतील... आणि मग आपल्या समोरच्या ताटात तो, भात म्हणून येईल, आपली भूक भागवायला.... (वदनी कवल घेता, नाम घ्या ..... )
त्याचा जमिनीपासूनचा ताटापर्यंतचा प्रवास फारच मेहनती, परावलंबी, निसर्गाच्या मूडशी मिळते जुळते घेणारा तरीही रंजक... हा प्रवास चालू होतो साधारण एप्रिल/ मे पासून ते आतापर्यंत, दिवाळीपर्यंत... त्यामध्ये यासाठी जमीन योग्य करणे, नांगरणे, ती उन्हात तापविणे, मृग नक्षत्राची चाहूल लागली की भात पेरणी करणे.. पाऊस वेळेत पडला तर ठीक, नाहीतर सगळे कष्ट वाया.. पाऊस झाल्यानंतर, मग हळुवार याला हिरवेगार कोंब फुटतात.. जमिनीच्या बाहेर येऊन, वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी आसुसलेले, जशी लहान बाळेच ती... वाऱ्याच्या, पावसाबरोबर हेलकावे घेत, आनंद घेत ती वाढु लागतात.. आजूबाजूचे तन, वेळच्यावेळी भांगलन करून काढले जाते.. त्यांची वाढ अजून सहज होते... असे करत करत साधारण नवरात्रीच्या वेळेस त्यांच्या मधून हळुवारपणे लोम्ब्या डोकावू लागतात.. मग अजून काळजी घ्यावी लागते... पावसाची साथ इथपर्यंत तर आवश्यक असते, मग तो परतायला लागतो.. पण त्याचा कल बदलला तर सगळे अवघड.. अवघे उभार पीक आडवे होऊ शकते... मग आली कापणी... पूर्वी बाय लोक आनंद गाणी म्हणत कापणी करायच्या... या सर्व प्रवासातून, मग हा आजचा दिवस, मळणीचा दिवस, या कष्टातून उभारलेल्या समाधानाचा दिवस.. नंतर या भाताला थोडे ऊन दिले जाईल, चांगले वाळवले जाईल आणि ३/४ महिन्यांनी त्याची कांंडपनी होऊन त्यातून मस्त तांदूळ बाहेर पडतील... आणि मग आपल्या समोरच्या ताटात तो, भात म्हणून येईल, आपली भूक भागवायला.... (वदनी कवल घेता, नाम घ्या ..... )
माझ्या कोल्हापूर शेजारील छोट्या शेतातून, माझी आई तसेच तीचे इतर सहकारी आज मळणी करताना..
मिलिंद '०२'११'२०१९'


No comments:
Post a Comment